किती करिसी मना अटाअटी ।।
व्यर्थ भोगिसी दुर्घट ।। १ ।।
व्यर्थ कां रे भ्रमलासी ।।
भजे मोरयापायांसी ।।
ध्रु. ।।
तूं म्हणशिल पुत्र कलत्र माझें ।।
हेचि नोव्हेती रे तुझें ।। २ ।।
ऐसें जाणतां तूं होसी मूर्ख ।।
दृढ धरी तूं विवेक ।। ३ ।।
गेले कल्प आयुष्याचे ।।
(पाय) चरण धरी मोरयाचे ।। ४ ।।
न धरी द्रव्याची वासना ।।
सांडी मायेचें पडळ ।। ५ ।।
जिहीं सांचिलें द्रव्य अपार ।।
त्यासीं पडली वेरझार ।। ६ ।।
मना सांडी सांडी विषयाची गोडी ।।
आयुष्य जाय घडोघडी ।। ७ ।।
वेंचिल्या द्रव्याच्या कोटी ।।
आयुष्य न ये क्षणभरी ।। ८ ।।
ऐसें आयुष्य आहे अमौलिक ।।
व्यर्थ जाऊं न दे पळ एक ।। ९ ।।
बहुत संसारी आहेत कष्ट ।।
चरणीं ठेवी मज निकट ।। १० ।।
विनवी दास चिंतामणी ।।
पुरली संसाराची झणी ।।
व्यर्थ कां रे भ्रमलासी ।।
भजे मोरयापायासीं ।। ११ ।।
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper